:-कोल्हापुरातील विसर्जन मिरवणूक तब्बल 24 तासाहून अधिक काळ चालली. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर कोल्हापूरकरांनी दिवसभर विशेषतः रात्रीच्या वेळी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.
डॉल्बीच्या ठेक्यावर नाचताना आणि गर्दीतून पुढे जाताना कित्येकांच्या चपला पायातून निघाल्यामुळे विसर्जन मिरवणुकीनंतर या मार्गावर चपलांचा खच पाहायला मिळाला.
महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून कोल्हापुरातील मुख्य सार्वजनिक गणेश विसर्जन मार्गावरील साफसफाई करताना तब्बल दहा ट्रॉली चपला आणि कचऱ्याचा ढीग उचलण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा