संबंधित घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला कुटुंबाच्या मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला होता. जिल्हा महिला व बालविकास समितीने मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपये इतकी आर्थिक मदत पीडित बालिकेच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला.
मंजूर मदत ही केवळ तत्काळ दिलासा देणारी असून वास्तविक झालेली हानी कोणत्याही आर्थिक सहाय्याने भरून न येणारी आहे. तथापि, या कठीण प्रसंगी शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे,
असे मंत्री कु. तटकरे यांनी नमूद केले. यापुढील काळात या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आवश्यक समन्वय, कायदेविषयक मार्गदर्शन, पुनर्वसनासंदर्भातील सहाय्य, तसेच पीडित कुटुंबाच्या रक्षण आणि हिताविषयीच्या सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्णतः कटिबद्ध असून, संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा